Saturday, February 11, 2012

शब्देविण संवादिजे........

निमित्त होत घसा खराब व्हायचं! त्यातून बरेच साक्षात्कार झाले. घसा इतका बिघडला कि बोलणच बंद झाल. मग सुरु झाल्या खाणा-खुणा. घरातले सगळे मला चांगलेच ओळखून असल्याने त्यांना मला काय म्हणायचे आहे ते लगेच कळत होते. त्यामुळे कम्युनिकेशनचा त्रास झाला नाही. पण बोलण कमी झाल्याने आपोआपच मन अंतर्मुख झाले. आणि मी परिस्थिती एन्जोय करायला लागले. गरज असेल त्याच्याशीच बोलायचे इतरांसाठी कारण होतेच कि घसा बसलाय ते!
.......................
..........................

मनातल्या मनात बोलणे वाढले. शांतपणे विचार करायला लागले कि नेहेमी मला असं शांत बसायला का नाही जमत?  का सगळ्या परिस्थितीचा मी तटस्थपणे विचार नाही करू शकत? हळू हळू जाणवायला लागले कि कदाचित मनाशी संवाद अपुरा पडतोय. कदाचित मनाशी संवाद साधायला सगळ्या बाह्य गोष्टींपासून लांब जावे लागते. अनावश्यक बोलणे हे त्यापैकी एक.
..........................................
..............................................
असच असेल का? एखाद्याशी आपले संबंध बिघडायला हीच अनावश्यक बडबड कारणीभूत असते. किती छान होईल न मग? जर नको असेल तेव्हा आपल्याला बोलताच नाही आले तर? कुठे थांबावं हे जर प्रत्येकाला कळलं तर  बऱ्याचश्या समस्या सुटतील. माणसाला नेमकं काय हवंय ते उमगायला लागेल. तसं म्हणावं तर बऱ्याच जणांना ते उमगलेलं असतं पण वळत नसतं. मग सुरु होते मृगजळामागे धावणे. .............आज काय तर घर हवंय, उद्या आणखी एखाद घर झालं तर बर. महत्वाकांक्षा असू नये असं मला सुचवायचं नाहीये. पण किती आणि कशासाठी याचा जरूर विचार करावा. 

थोडी प्रबोधनपर झालीये पोस्ट! इतरांना कमी स्वतःला जास्त उद्देशून लिहिलंय. loud thinking का काय म्हणतात न  तेच! 


5 comments:

  1. agadi khar ahe. Vayphal bolnyane fakt prashna vadhtat ani na bolnyane te suttat hech khar!!!

    ReplyDelete
    Replies
    1. मौनं सर्व अनर्थ हरणं! पण जमत नाही नेहेमी. ब्लॉगवर स्वागत.

      Delete
  2. शांत राहणं हे कोणत्याही प्रश्नच उत्तर असू शकतं

    ReplyDelete
  3. बास! सहा महिने झाले तुम्ही ब्लॉग लिहिताय आणि मला हे आज कळतंय! छे छे छे :)

    BTW खूप छान लिहिता तुम्ही.. आणखी वाचायला नक्कीच आवडेल.
    खूप खूप शुभेच्छा!!

    ReplyDelete
  4. धन्यवाद! ब्लॉगवर स्वागत!

    ReplyDelete